नंदुरबार..
धडगांवअ गावात पिण्याच शुद्ध पाणी सुद्धा नाही तर अनेक गावात पिण्याच पाण्याची सोय ही नाही..
धडगांवअ गावात पिण्याच शुद्ध पाणी सुद्धा नाही तर अनेक गावात पिण्याच पाण्याची सोय ही नाही..
पाण्याला आपल्याकडे जीवन म्हटलं आहे.पाण्यावर आपण सगळेच अवलंबून असतो,पण असं असलं तरी अजूनही नंदूरबार सारख्या आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा यातील अक्रानी तालुक्यातील स्थितीत बदल झाल्याचे दिसत नाही इथं आज ही 2,3 किलोमीटरवरून महिलांना पाणी आणावं लागतं.आणि काही गावांना तर हेही नशिबी नाही उन्हाळात तर येथील पाणी प्रश्न नेहमीच चर्चेत असतो परंतु यावर कायमचा उपाय योजना करण्यास येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अयशस्वी ठरले आहे. आणि खरं म्हणजे आज ही 80% ग्रामीण गावात नळाने पाणीपुरवठा केला जात नाही आज पण लोकं विहीर हातपंप वर पाणी आणायला जात असतात ते पण अशुद्ध पाणी असल्याने ग्रामीण भागात अनेक समस्या होतात. आजर मोठ्या प्रमाणात फोफावत आहे शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे व काही ठिकाणी तर कोणतीही व्यवस्था पिण्याचा पाण्यासाठी नसल्याची दिसून येते.
अनेक विहिरी आणि हातपंप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने काढण्यात आली आहे परंतु पावसाळा संपला की हे विहीर हातपंप कोरडे पडत असल्याचे चित्र असतं आणि अनेक गावातील हातपंप हे बिघडलेले नादुरुस्त असल्याचे दिसते निम्म्या पेक्षा जास्त ग्रामीण भागात घरांमध्ये पाणीपुरवठा नाही.ज्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळानं होतो. अशी घर तालुक्याचा ठिकाण वगळता जवळजवळ बाकी गावात दिसणार नाही लांबवरून पाणी आणावं लागतं.
भारत स्वतंत्र होवून सत्तरी उलटली तरी ग्रामीण भागात घरापर्यंत आपण पाणी पोचवलेलं नाही हे दुर्दैव म्हणवे लागेल. घरात शुद्ध पाणी नसल्यामुळे अशुद्ध पाण्यामुळे रोगराई होते, त्यावर खर्च होतो, स्त्रियांना फार लांबवरून पाणी आणावं लागत असल्याने त्यांना पाठीचे-मणक्याचे आजार सारखे होतात आणि अशुद्ध पाणी प्यावं लागत असल्यामुळे आणखी अनेक आजार होत असतात आणि ग्रामीण भागातील लोकांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या सत्तर वर्षा पासून आपण आपल्या ग्रामीण भागात साधं पिण्याच शुध्द पाणी सुद्धा देऊ शकलो नाही शुद्ध पाणी तर सोडाच परंतु अजून ही असंख्य गावात तर पाण्याची सोय पण नाही हे दुर्दैवच आपले लोकप्रतिनिधी मात्र आज ही अश्या मूलभूत गरजा सोडवून देऊ या मुद्यावर निवडणूक लढवत आहे. आरे जग कुठं चाललय आणि आपण अजून आपल्या तालुक्याच्या गावात पिण्याची पाण्याची सोय सुद्धा केली नाही कधी होईल आपल्या मतदरसंघाचा विकास कधी भेटेल ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच पाणी ग्रामीण भागातील लोकांचा नशिबी शुद्ध पिण्याच पाणी सुद्धा नाही हे बघून ग्रामीण भागातील लोकांची कैफियत समजू शकते काय जीवन जगत असतील ग्रामीण लोक अखेर हा सर्व बदल कधी आणि कोण घडवून आणेल हीच आशा बाळगून आज ही ग्रामीण भागातील लोकं जीवन जगत आहे कोणी तरी बदल घडवून आणेल आपल्या जीवनात हीच आशा आज ही बाळगून आहे..
भारत स्वतंत्र होवून सत्तरी उलटली तरी ग्रामीण भागात घरापर्यंत आपण पाणी पोचवलेलं नाही हे दुर्दैव म्हणवे लागेल. घरात शुद्ध पाणी नसल्यामुळे अशुद्ध पाण्यामुळे रोगराई होते, त्यावर खर्च होतो, स्त्रियांना फार लांबवरून पाणी आणावं लागत असल्याने त्यांना पाठीचे-मणक्याचे आजार सारखे होतात आणि अशुद्ध पाणी प्यावं लागत असल्यामुळे आणखी अनेक आजार होत असतात आणि ग्रामीण भागातील लोकांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या सत्तर वर्षा पासून आपण आपल्या ग्रामीण भागात साधं पिण्याच शुध्द पाणी सुद्धा देऊ शकलो नाही शुद्ध पाणी तर सोडाच परंतु अजून ही असंख्य गावात तर पाण्याची सोय पण नाही हे दुर्दैवच आपले लोकप्रतिनिधी मात्र आज ही अश्या मूलभूत गरजा सोडवून देऊ या मुद्यावर निवडणूक लढवत आहे. आरे जग कुठं चाललय आणि आपण अजून आपल्या तालुक्याच्या गावात पिण्याची पाण्याची सोय सुद्धा केली नाही कधी होईल आपल्या मतदरसंघाचा विकास कधी भेटेल ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच पाणी ग्रामीण भागातील लोकांचा नशिबी शुद्ध पिण्याच पाणी सुद्धा नाही हे बघून ग्रामीण भागातील लोकांची कैफियत समजू शकते काय जीवन जगत असतील ग्रामीण लोक अखेर हा सर्व बदल कधी आणि कोण घडवून आणेल हीच आशा बाळगून आज ही ग्रामीण भागातील लोकं जीवन जगत आहे कोणी तरी बदल घडवून आणेल आपल्या जीवनात हीच आशा आज ही बाळगून आहे..
✍️....दिलीप व्ही. पावरा
अगदी खरी परिस्थिती आहे...!!!
ReplyDelete