Skip to main content

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचे गंभीर प्रश्न...

नंदुरबार
कुपोषणाच्या बाबतीत राज्यात सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे उघडकीस आहे.प्रत्यक्षात मात्र आजही जिल्ह्यात मोठ्या संख्येने कुपोषित बालकांची संख्या असल्याचे समोर आले आहे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेतील अक्रानी अक्कलकुवा तालुक्यात कुपोषणाचे गंभीर प्रश्न आजही कायम असल्याचे निदर्शनास येत आहे.
सापुड्यातील कुपोषण व बालमृत्यूचा प्रश्‍न राज्यातच नव्हे तर देशात गाजले आहेत.
येथील कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त येत असल्याने गेल्या काही वर्षापासून कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यू कागदावरच कमी केले जात असल्याची शंका वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे.
यावरूनच महिला व बालकल्याण विभाग कुपोषणाचे प्रमाण केवळ कागदावरच कमी होत असल्याचे चित्र रेखाटत असल्याचे उघड होत आहे.
कुपोषण,बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात गेल्यावीस वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे शंभर कोटी रुपये खर्च झाले.असल्याचे बोलले जात आहे मात्र या विषयाला तात्पुरती"मलमपट्टी'केली जाते मुळापासून उपाय केला जात नाही.कुपोषण-बालमृत्यू टाळण्यासाठी अनेक उपाय योजना आहे.भरारीपथकाद्वारे,घरभेटीतूनतपासणी,प्रसूतीसाठी माहेरघर,आरोग्यसहायकांकडून पाहणी,आशा,आरोग्यसेविकांच्या,घरभेटी बाळांचीनोंदणी,"मानवविकास'कार्यक्रमांतर्गत तपासणी,समुपदेशन,बालोपचारकेंद्र,ग्रामबालक  विकासकेंद्र,पोषणपुनर्वसन केंद्र,प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृतआहार योजना,कुपोषणमुक्ती कक्ष,पोषणआहार योजना आदी.परंतु पाहिजे त्या प्रमाणात कुपोषणच्या समस्या मात्र सुटलेल्या दिसत नाही.तर काही योजना ह्या फक्त कागदावरच असून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात पाहिजे त्या पद्धतीने ह्या योजनेचे लाभ मिळत नाही.तर काही अंगणवाडी केंद्रात योग्य व पुरेसा आहार दिला जात नसल्यामुळे  हे चित्र कायम असल्याचे दिसत.बालविवाह प्रतिबंधक कायदा असून सुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असल्याचे दिसून येते कुठेतरी अश्या गोष्टी रोखायला हव्या आणि हया प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील विकासाचा आड येणाऱ्या कारणांपैकी कुपोषण हे मुख्य कारण असल्याचे मानलं जात आहे. 
गेल्या अनेक वर्षांपासून येथील कुपोषणावर करोडो पैसे खर्च होत आहे मात्र कुपोषणाचे प्रमाण काही कमी झाले नसल्याचे दिसतं.
 बाळांना जन्म देणाऱ्या माताच कुपोषित असतील, तर बाळ कसे पोषित जन्माला येणार,असा प्रश्‍न कायम उभा राहतो.जननीसुरक्षा,आईची काळजीगरोदर-स्तनदामातांची तपासणी असे उपक्रम राबवले जातात.मात्र मुळात या मातांना,त्यातून पोषणा बाबतची तळमळ भावना जागृत होणे आवश्‍यक आहे;अन्यथा कितीही योजना आल्या,तरी बालकांचे कुपोषण कायम राहील.योजना राबवणाऱ्यांचे भरण-पोषण होईल,हे वास्तव नाकारता येणार नाही. 
जिल्ह्यातील बालमृत्यू 
वर्ष - संख्या 
2014 - 1024 
2015 - 1243 
2016 - 788 
2017 - 917 
2018 - 116 
(स्त्रोत : आरोग्य विभाग अहवाल) 
जिल्ह्यातील बालकांची स्थिती 
शून्य ते सहा महिने - 10,687 
सात महिने ते सहा वर्षे - 1,19,463 
एकूण बालके - 1,51,893 
कुपोषित कमी जोखीम - 14,673 
कुपोषित अतिजोखीम - 3,687

                    ✍️.... दिलीप पावरा




           

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

नंदुरबार. ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

सातपुडा कुशीतील आदिवासी पावरा समाज..

 सा तपुड्यातील आदिवासी पावरा समाज अन् त्यांची  संस्कृती... आदिवासी पावरा समाज  हा   महाराष्ट्र , मध्य प्रदेश  व  गुजरात  यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून ,नंदुरबार  जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात.महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळून येते. पावरा जमातीचे लोक सावळ्या रंगाचे व स्वभावाने थोडे लाजरे असतात या समाजाची संस्कृती एखाद्या अतिशय पुढारलेल्या समाजाला ही लाजवेल अशी आहे.  पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो.नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया,अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्...

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची प्रसिध्द होळी पर्व..

सातपुड्यातील आदिवासी बांधवांची आगळी वेगळी होळी.. ओली आवे बारा मोयना ओली या, ओली आवे खोकलू वोलती ओली या...!"                 अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जातात अन्आ होळी ला सुरुवात होते.होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला सा...